Home राजकारण ‘राजाराम’च्या निकालात टर्निंग पॉईंट….

‘राजाराम’च्या निकालात टर्निंग पॉईंट….

2 second read
0
0
413

फक्त कोल्हापूर जिल्हा नव्हे तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सत्ता महाडिक यांच्या ताब्यात आली आहे. एकमेव संस्थेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या विरोधी सतेज पाटील गटाचा पार धुवा उडवला. हा राजकीय वाद बिंदू चौकात आल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. कोल्हापुरात सलग निवडणुका जिंकण्याचा पराक्रम आणि भाजपाला जिल्ह्यात पायही ठेवून देणार नाही असं वक्तव्य करणाऱ्या सतेज पाटील यांना इतक्या दारूण पराभवाला का सामोरे का जावे लागल? मात्र, सतेज पाटील यांनी कारखान्याचे मैदान मारायचेच या जिद्दीने दिलेली एकाकी लढत उल्लेखनीय असली तरी राज्यातील सत्तांतरापासून घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि मुन्ना महाडिकांना भाजपाकडून मिळालेली राज्यसभेची खासदारकी राजारामच्या निकालात टर्निंग पॉईंट ठरला आहे. सत्तांतरानंतर सतेज पाटलांनी केलेल्या मशागतीच्या विरोधात फासे पूर्णतः उलटे पडत गेले.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…