Home Uncategorized राजारामचा २१-० चा पराभव बंटींना अद्याप पचलेला नाही – अमल महाडिक

राजारामचा २१-० चा पराभव बंटींना अद्याप पचलेला नाही – अमल महाडिक

5 second read
0
0
1,099

कसबा बावडा- दि.०७/०९/२०२३छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदत्वाबाबत पुन्हा एकदा गैर मार्गाने सभासदांच्यावर अन्याय करून त्यांचा हक्क हिरावून घेण्याचा दुर्देवी प्रयत्न विरोधकांनी केलेला आहे. तो आम्हास व सभासदांना कदापीही मान्य नाही.मा. सर्वोच्च न्यायालयाने या सभासदांना न्याय देऊन फेर तपासणीचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांना दिलेले होते. यामध्ये न्यायालयाने सभासदांना त्यांच्या विषयी काय तक्रार आहे व त्या सोबत कोणती कागदपत्रे जोडली आहेत आणि स्क्रुटिनी रिपोर्ट उपलब्ध करून देणे विषयी निर्देश दिले होते. तथापी या पैकी कोणतीही कागदपत्रे त्या सभासदांना उपलब्ध करून देणेत आलेली नाहीत. तसेच रितसर कागदपत्रे हजर करणेस पुरेसा वेळ दिलेला नाही. त्यांचे रितसर म्हणणे आणि कागदपत्रांची कायदेशिर योग्य छाननी प्रादेशिक सहसंचालकानी केलेली नाही. प्रादेशिक सहसंचालकांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे कोणतेही पालन न करता विरोधकांनी परस्पर दाखल केलेल्या कागदपत्रांच्या आधारे सदरचा बेकायदेशीर आदेश दिलेला आहे. प्रादेशिक सहसंचालकांनी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न करता दिलेल्या या आदेशा विरोधात त्यांच्या विरुध्द सभासदांचेकडून आम्ही अवमान याचिका देखील दाखल करणार आहोत. तसेच यासाठी पुन्हा एकदा आम्ही या सभासदांना न्याय देण्यासाठी या निकाला विरोधात राज्य सरकारकडे अपिल करणार आहोत सदरचा प्रादेशिक सहसचालकांचा आदेश हा समासदांच्या आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या विरोधातील असून या निकालाला स्थगिती मिळविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असे ठामपणे अभिवचन देतो.प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने बंटी पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेली वक्तव्य बालीशपणाचे आहेत. प्रत्यक्षात या निकालाचा कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणूक निकालाशी कोणताही काडीचा संबंध नसताना कायदेशिर प्रक्रियेनुसार पार पडलेल्या निवडणूकीच्या संदर्भात करून ते सभासदांच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ म्हणजे फक्त राजकीय गट सांभाळणे एवढ्याच पुरता मर्यादित असून, त्यांच्या गटाच्या पराभूत उमेदवारांना मी काही तरी करून दाखवतोय आहे असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.या निकालामध्ये मोठीमोठी आकडेवारी सांगून सभासदामध्ये निष्कारण चुकीची माहिती सांगण्याची उठाठेव से करीत असून खूप मोठ्या संख्येने १८९९ सभासदांचा प्रश्न असल्याचे ते भासवत आहेत. प्रत्यक्षात यापैकी ५५८ सभासद पात्र ठरले आहेत आणि ३३९ भादोले येथील सभासद मतदानास यापूर्वीच कारखान्याने उगळले होते. उर्वरित पैकी १०७ सभासद मयत आहेत. २ सभासद शेअर्स रद व अन्य नावे वर्ग झालेले आहेत. ही संख्या विचारात घेता हा विषय ८२४ सभासदापुरताच संबंधित येतो. हे ८२४ सभासद मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने निवडणूकीच्या वेळी पात्रच होते. तरी देखील नुकत्याच झालेल्या निवडणूकीचा निकाल पाहता मी स्वतः सर्वाधिक २२०५ मतांनी व आमचे सत्तारूढ पॅनेलचे सर्व उमेदवार सरासरी १६०० मतांनी विजयी झालेले आहेत. हा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा आहे. त्यामुळे या सभासदांच्या जीवावर सत्ता मिळविली हे सतेज पाटलांचे वक्तव्य पोरकटपणाचे ठरते. खरे पाहता २१-० झालेला दारूण पराभव त्यांना चार महिने उलटले तरीही पचवता आलेला नाही, हेच सुर्यप्रकाशा इतके खरे सत्य आहे. ( अमल म. महाडिक) चेअरमन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश स…