कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जात असताना गाडी क्रमांक एम. एच.०४ डी जे २४६६ या गाडीचा गोगवे ता. शाहुवाडी या गावाजवळ अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी चा टायर फुटुन अपघात झाला.
अपघातात ५ जन जखमी झाले. त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे ईथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी धनंजय आकाराम पाटील वय ४३ अतिग्रे, प्रेम प्रकाश पाटनकर वय २६ इचलकरंजी, मंकुद शिरगावकर वय ३०, स्वप्नील बाळासो केरले इचलकरंजी वय २३, सागर रावसो चौगुले वय ३५ अशी अपघात ग्रस्ताची नावे आहेत. यातील धनंजय आकाराम पाटील यांना जास्त दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रूगणालयात पाठवण्यात आले आहे.
KK प्रतिनिधी राहुल पाटील