गेले कित्येक दिवस संपूर्ण जिल्ह्याच लक्ष हे राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लागलेल आहे. या निवडणुकीची लढाई अमल महाडिक आणि सतेज पाटील या दोन्ही गटांमध्ये सुरू असताना मधल्या काळात या निवडणुकीच्या राजकीय वातावरणाचे पडसाद हे सगळीकडे उमटू लागले. एकमेकांवर टीका करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत या राजकारणाने वेगळंच वळण घेतलंय.. दोन्ही आघाड्यांनी या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे.मध्यंतरी आमदार …