गेले कित्येक दिवस संपूर्ण जिल्ह्याच लक्ष हे राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लागलेल आहे. या निवडणुकीची लढाई अमल महाडिक आणि सतेज पाटील या दोन्ही गटांमध्ये सुरू असताना मधल्या काळात या निवडणुकीच्या राजकीय वातावरणाचे पडसाद हे सगळीकडे उमटू लागले. एकमेकांवर टीका करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत या राजकारणाने वेगळंच वळण घेतलंय.. दोन्ही आघाड्यांनी या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली आहे.
मध्यंतरी आमदार सतेज पाटील यांनी 1899 सभासद अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर न्यायालयाने महाडिक यांच्या बाजूने निकाल दिल्याने पहिला धक्का सतेज पाटील यांना बसला होता. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर अर्ज छाननी नंतर महाडिक गटाने पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरवले.एका पाठोपाठ एक धक्के बसल्याने सतेज पाटील गटाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. पण उच्च न्यायालयाने ही सुद्धा याचिका फेटाळून लावली त्यामुळे सतेज पाटील गटाला याचा मोठा धक्का बसला.. अनेक प्रचार सभांच्या माध्यमातून दोन्ही गटांनी याविरुद्ध टीकाटिप्पणी करायला सुरुवात केली. आपण कसे योग्य आहे हे लोकांना पटवून सांगण्यात आलं.
अशातच आज महाडिक गटाकडून विजयी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा कुंभोज येथे होणार असून या सभेच्या पोस्टर वरती खासदार धैर्यशील माने ,आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे फोटो लावल्याने यातून त्यांनी महाडिक गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट होत आहे.
हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक मतदार असल्याने महाडिक गटाची स्वतःची यंत्रणा, आणि कोरे आवडे यड्रावकर तसेच माने यांची संघटना सोबत असल्याने महाडिक गटाचे पारडे जड झाल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे कागल मधून राजे समरजितसिंह घाडगे यांनी सुद्धा महाडिक गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या अटीतटीच्या निवडणुकीत विजय कोणाचा होणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलय.
जाहिरात