मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ कोल्हापूर’ व ‘हातकणंगले’ मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे.शिवसेनेच्या फुटीनंतर कोल्हापुरातील दोन्ही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी विकास निधी बरोबरच त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली होती.
त्यामुळेच दोन्ही ठिकाणी उमेदवारी बदलाबाबत मित्र पक्षांनी हट्ट धरूनही संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्यावरच त्यांनी विश्वास टाकला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कोल्हापुरात येऊन त्यांनी अंदाज घेतला, अर्ज भरण्यासाठी ते आलेत. दोन्ही मतदारसंघांत रात्रभर गाठीभेटी घेतल्यानंतर कोणत्या दुरुस्त्या करायला पाहिजेत, हे त्यांच्या लक्षात आले. महाविकास आघाडीचे शक्तिस्थळ असलेल्या सहकारी संस्थांवर त्यांची विशेष लक्ष दिले असून साखर कारखान्यांसह दूध संघ, बँकांच्या संचालकांना थेट संपर्क सुरू केला आहे.