फक्त कोल्हापूर जिल्हा नव्हे तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची सत्ता महाडिक यांच्या ताब्यात आली आहे. एकमेव संस्थेवर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या विरोधी सतेज पाटील गटाचा पार धुवा उडवला. हा राजकीय वाद बिंदू चौकात आल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. कोल्हापुरात सलग निवडणुका जिंकण्याचा पराक्रम आणि भाजपाला जिल्ह्यात पायही ठेवून देणार नाही असं वक्तव्य …